बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. नुकताच त्याचा ‘तू झुटी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खरं तर मागचं वर्ष त्याच्यासाठी लकी ठरलं, रणबीरचा ‘शमशेरा’ जरी आपटला असला तरी त्याचा ब्रह्मास्त्र चित्रपट सुपरहिट ठरला. तसेच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याने अभिनेत्री आलिया भट्टबरोबर लग्नगाठ बांधली तसेच त्यांना कन्यारत्नाचादेखील लाभ झाला. सध्या दोघे खुश आहेत. मात्र रणबीर आलियाच्या एका गोष्टींवरून नाराज आहे.

रणबीर कपूर आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील चर्चेतील जोडी, लग्नानंतर त्यांचे चाहतेदेखील खुश झाले. सध्या हे जोपदे वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. रणबीरने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने पत्नी आलियाबद्दलची एक खटकणारी गोष्ट सांगितली. ती गोष्ट म्हणजे बाथरूममधून बाहेर आल्यावर आलिया तिचा टॉवेल जागेवर न ठेवता इतरत्र फेकून देते. तसेच तिचे मेकअपचे सामानदेखील असे फेकून देते, बाकी तसे तिचे नियोजन व्यवस्थित असते.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

“माझ्या पतीने अनेक अभिनेत्रींबरोबर…” निर्माता आदित्य चोप्राबद्दल राणी मुखर्जीचा खुलासा

‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी फिरत होता या प्रमोशनमध्येच त्याने सोशल मीडियावर सक्रीय नसण्यामागचं कारण सांगितलं आहे तो असं म्हणाला, “माझं हे म्हणणं आहे की सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

दरम्यान ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.