Nimrat kaur Reaction on Operation Sindoor: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर सर्व मृतांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात होती. याचदरम्यान, भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.
बुधवारी रात्री १:३० च्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे. या एअर स्ट्राईकवर बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरने ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पोस्ट केली आहे.
निम्रत कौरची पोस्ट
आपल्या सैन्याबरोबर एकजूट आहोत. एक देश. एक ध्येय. #जयहिंद #ऑपरेशनसिंदूर अशी पोस्ट निम्रत कौरने केली आहे.

दरम्यान, रितेश देशमुख व मधुर भांडारकर यांनीही या एअर स्ट्राईकबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. रितेशने जय हिंद की सेना अशी पोस्ट केली आहे. “आमच्या प्रार्थना आमच्या सैन्याबरोबर आहेत. एक राष्ट्र, तुमच्याबरोबर एकत्र आम्ही उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम…”, अशी पोस्ट मधुर भांडारकरने केली.
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरू
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद या पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक केला आहे.
आज देशभरात मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. त्याची तयारीही चालू होती. मात्र त्याआधीच बुधवारच्या मध्यरात्री भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली आहेत. भारताने कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नसून फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे.