Mamta Kulkarni Returns to Mumbai : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. ‘करण अर्जुन’ फेम अभिनेत्रीने मुंबईत आल्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मुंबईत परत आल्यानंतरच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ममता कुलकर्णीने २००० साली देश सोडला होता. त्यानंतर ती एकदा भारतात आली होती; मात्र आता तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतल्यावर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिने फ्लाइट लँड होताच विमानात उंचावरून भारताला पाहून भारावून गेले असं म्हटलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना डोळ्यात अश्रू होते, असं ममता म्हणाली.

ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक

ममताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की ती २०१२ मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी ती जानेवारीच्या शेवटी प्रयागराजमध्ये होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी पुन्हा देशात परतली आहे. १२ वर्षांनी भारतात आणि २५ वर्षांनंतर मुंबईत आल्याचं ममताने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं.

हेही वाचा – पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा

पाहा व्हिडीओ –

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव आलं होतं. त्यानंतर ती भारतातून निघून गेली होती. २००० हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात ममता व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं आली होती. दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला क्लीन चिट देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली आहे. त्यानंतर ती आता मुंबईत परत आली आहे.

रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

या ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने ममता कुलकर्णीच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. ५२ वर्षांच्या ममताने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘नसीब’, ‘बाजी’, ‘करण अर्जुन’, ‘आंदोलन’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’, ‘छुपा रुस्तम’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

Story img Loader