Rishi Kapoor Last Wish : अभिनेते ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर व त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी या त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि विविध मुलाखतींतूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनीनं अलीकडेच एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमाने तिच्या वडिलांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या. त्यांच्या दोन इच्छांपैकी एक इच्छा पूर्ण झाली असून, एक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छांविषयी बोलताना सांगितलं, “त्यांची पहिली इच्छा होती की, रणबीरचा विवाह व्हावा.

1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
actor naseeruddin shah and actress ratna pathak shah in ratnagiri for natya mahotsav
नाट्य महोत्सवासाठी अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!

हेही वाचा…‘भागम भाग’ सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या…

रिद्धिमा पुढे म्हणाली, “रणबीरच्या लग्नाबरोबरच त्यांच्या वांद्रे येथील घराचं बांधकाम पूर्ण व्हावं ही त्यांची दुसरी इच्छा होती. आमच्यासाठी हे खूप भावनिक होतं. मला खरंच वाटतं की, ते आज आमच्याबरोबर असायला हवे होते; पण देवाच्या योजना वेगळ्या होत्या.”

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं. त्यामुळे ऋषी कपूर यांची पहिली इच्छा पूर्ण झाली. तर, वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचं काही वर्षांपासून बांधकाम सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण होणार आहे.

हेही वाचा…‘क्रिश ४’ चित्रपटाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केला खुलासा; म्हणाले, “यापुढे मी…”

रणबीर-आलियाच्या साध्या आणि खास लग्नाची आठवण

रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल रिद्धिमानं सांगितलं की, तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं; परंतु रणबीर आणि आलिया यांनी साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिद्धिमा म्हणाली,“माझं लग्न थाटामाटात पार पडलं आणि त्यामुळे मला खूप काही एन्जॉय करता आलं नाही. माझ्या वडिलांना खूप मोठं लग्न करायचं होतं आणि त्यांनी तसं केलंही. पण रणबीरचं मत वेगळं होतं. तो म्हणाला, ‘आम्ही कुटुंबात मोठं लग्न पाहिलं आहे. यावेळी साधेपणानं करू.’ रणबीर खूप साधा मुलगा आहे. आलियाही तशीच साधी आहे. त्यामुळे त्यांना कमी लोकांमध्ये लग्न करायचं होतं.”

हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…

रणबीर आणि आलियानं लग्नाच्या वेळी त्यांना महत्त्वाचे वाटणारे, नेहमी संपर्कात असणारे लोकच बरोबर असावेत, असं ठरवलं. रिद्धिमा म्हणाली, “त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला फक्त जवळचे लोक हवे आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही रोज संपर्कात असतो. त्यांच्याबरोबर आम्हाला आमचं लग्न एन्जॉय करायचं आहे.’ यामुळे ते प्रत्येक पाहुण्याला वेळ देऊ शकले आणि चांगल्या आठवणी तयार करू शकले.”

Story img Loader