ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.रेल्वेच्या झालेल्या अपघातामुळे अनेकांना जोरदार धक्का बसला आहे.

या दुर्घटनेबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. फिल्म सेलिब्रिटीजनीसुद्धा याबाबतीत ट्वीट करत हळहळ व्यक्त केली आहे. ज्युनिअर एनटीआर, विवेक अग्निहोत्री, अक्षय कुमार, सनी देओल, परिणीती चोप्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Narendra Modi ANI
“…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

आणखी वाचा : अनुराग कश्यपचा ‘केनडी’ पाहून दिग्दर्शक शेखर कपूर झाले भावुक; म्हणाले, “या चित्रपटाने…”

सोनू या अशा घटनांबाबत कायमच स्पष्टपणे त्याची बाजू मांडतो. कोविड काळात त्याने केलेली मदत आणि जपलेलं समाजभान आपल्याला ठाऊक आहे. नुकतंच त्याने या संदर्भात एक व्हिडीओ ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे आणि अपघातात सापडलेल्या लोकांच्या कुटुंबासाठी त्याने प्रार्थना केली आहे. सरकारने दिलेल्या नुकसान भरपाईनंतर या लोकांचे हाल काय होतील ही चिंतादेखील सोनूने या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

तो याबद्दल म्हणाला, “आपण एक ट्वीट करतो, शोक व्यक्त करतो आणि नंतर आपल्या कामात मग्न होतो, पण जी लोक आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घरदार सोडून दुसऱ्या शहरात जातात, त्यांचं काय? आज बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, ते पुन्हा खंबीरपणे उभे राहू शकतील का?” इतकंच नव्हे तर या व्हिडीओमधून सोनूने लोकांना आणि सरकारला एक विनंतीही केली आहे.

सोनू म्हणाला, “माझी सगळ्यांना एक विनंती आहे की हे चित्र बदलण्यासाठी सगळ्यांनीच काहीतरी करा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ताच याबाबतीत काही ठोस पावलं उचलायला हवीत ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टळतील आणि आपल्याला एक धडा मिळेल.”