अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीबरोबर एक पत्रकार परिषद घेतली. राखी सावंतने ‘मीटू’ मोहिमेदरम्यान तनुश्री दत्तावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता राखी व आदिलचा वाद सुरू असताना ती आदिलला पाठिंबा देण्यासाठी समोर आली आहे. यावेळी राखीने आपले व्हिडीओ व्हायरल केले होते, त्यामुळे प्रचंड त्रास झाल्याचं तनुश्री म्हणाली. तसेच आदिलमुळे हिंमत मिळाली असल्याने इतक्या वर्षांनी आता समोर येऊन राखीबद्दल बोलत असल्याचंही तिने नमूद केलं.

“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
nouran aly on vivian dsena converting into islam
विवियन डिसेनाने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला? पत्नी म्हणाली, “आमच्या धर्मात स्त्रिया…”

राखी सावंतने आतापर्यंत पाच लग्नं केली आहेत, असा दावा तनुश्री दत्ताने केला. ती म्हणाली, “राखी सावंतला काहीतरी मानसिक आजार आहे. कारण ती ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्याबद्दल बोलली होती, ते ऐकून मलाच धक्का बसला होता. कारण कोणतीच मुलगी दुसऱ्या मुलीबद्दल इतके वाईट विचार करूच शकत नाही आणि तिने फक्त विचारच केला नाही, तर बोललीसुद्धा. तिने पाच लग्नं केलीत, कधी कधी वाटतं माणूस एकदा चूक करेल, दुसऱ्यांदा करेल, पण तिसऱ्यांदा तरी सेटल होईलच. पण पाच लग्नं. मला वाटतं कदाचित तिला पुरुषांमध्ये इंटरेस्टच नाही.”

“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

आदिल म्हणाला की पाचवं लग्नं माझ्याशी केलेलं तेही मोडलं आता सहाव्याची चर्चा सुरू आहे. त्यावर तनुश्री म्हणाली, “मला खरंच वाटत नाही की तिला पुरुष आवडतात. कारण तिने जशा गोष्टी माझ्याबद्दल केल्या, त्या फार विचित्र होत्या.” तर राखी या सगळ्या गोष्टी पैशांसाठी करत असल्याचं आदिलने म्हटलं.

आदिल खानने राखीमुळे पालकांना त्रास झाल्याचा खुलासा केला. “माझ्या आई-वडिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास राखीमुळे सुरू झाला आहे. तिने मला कोणतेही कारण नसताना तुरुंगात टाकले, तुम्ही सर्वजण माझ्या आई-वडिलांच्या स्थितीची कल्पना करू शकता जेव्हा त्यांना कळलं की मला तुरुंगात टाकण्यात आलंय. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, ती माझ्या आई-वडिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळली,” असा आरोप आदिलने केला.

Story img Loader