‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर २०२३ मध्ये चांगली कमाई करणारा ‘द केरला स्टोरी’ हा दुसरा चित्रपट आहे.

हेही वाचा : “वरुण सूदशी ब्रेकअप केलं, कारण…” दिव्या अग्रवालने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली “अपूर्वला भेटले अन्…”

South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भात अभिनेत्री अदा शर्मा हिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अदाने लिहिले आहे, “चित्रपट रिलीज होऊन आज ५ आठवडे पूर्ण झाले आहेत. अनेक जण मला मेसेज करत असतात. आम्ही २ ते ३ वेळा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेत तिकिटाचे दर ९९ रुपये केले आहेत.” प्रेक्षकांना ६ जूनपासून हा चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे, ही ऑफर आता सर्व सिनेमागृहांमध्ये लागू झालेली आहे. या सिनेमाने भारतात २३७.६२ कोटी, तर जगभरात २९२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा : शुबमन गिलबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर करणारी ‘ती’ मुलगी कोण? नेटकरी म्हणाले, “सारा भाभी…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने ३५.४९ कोटींची कमाई केली होती. यानंतर अवघ्या ९ दिवसांमध्ये चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता आणि त्यानंतर १७ व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तर याउलट काही भागांत हा चित्रपट टॅक्स-फ्री करण्यात आला होता.