कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. तिच्या हटके स्टाइलमुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता ती तिच्या पद्धतीने तिचं आयुष्य जगताना दिसते. आता तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली एक स्टोरी खूप चर्चेत आली आहे.

उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. याचबरोबर तिला खटकणाऱ्या गोष्टींबाबतही ती बिनधास्तपणे व्यक्त होत असते. आता माधुरी दीक्षित आणि एका कार्यक्रमाच्या आयोजकांवर तिने जोरदार टीका केली आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

उर्फी जावेदबरोबर काल एक वेगळीच घटना घडली. नेमकं काय झालं हे तिने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत सांगितलं. या स्टोरीमध्ये तिने माधुरी दीक्षितचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “या कार्यक्रमाबद्दल एक विनोदी बाब म्हणजे – त्यांनी माझ्या टीमच्या मार्फत मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं, त्या दिवशीचे माझे सगळे प्लॅन्स रद्द केले, कार्यक्रमासाठी कपडे जमवले आणि शेवटच्या घडीला त्यांनी मला सांगितलं की, या कार्यक्रमासाठी आता मी निमंत्रित नाहीये. यामागचं कारण जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा मी माधुरी दीक्षितच्या गेस्ट लिस्टमध्ये नाही, असं ते म्हणाले. हे अत्यंत विचित्र कारण आहे.”

हेही वाचा : माधुरी दीक्षितला डावलून ‘परदेस’ चित्रपटासाठी सुभाष घईंनी केली होती महिमा चौधरीची निवड, कारण…

पुढे तिने लिहिलं, “मी कुठेही जाण्यासाठी उत्सुक झाले नव्हते. पण एखाद्याला निमंत्रित केल्यानंतर ऐन वेळी त्याला ‘तू येऊ नकोस’ म्हणून सांगायचं म्हणजे…” इन्स्टाग्राम स्टोरीबरोबरच तिने ही पोस्ट ट्विटरला देखील शेअर केली. आता तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आयोजक आणि माधुरी दीक्षितच्या या वागण्यावर टीका करत आहेत.