चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणून दिलीप प्रभावळकरला ओळखले जाते. नुकतंच मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण सांगितली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे हसवाफसवी हे नाटक प्रचंड गाजले. या नाटकाचे अनेक प्रयोग हाऊसफुल ठरले होते. यासोबतच दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगादरम्यानची एक खास आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

“मुलीसाठी नाव सुचवा” लेकीसोबतचा क्यूट व्हिडीओ शेअर करत कैलास वाघमारेने चाहत्यांना केली विनंती

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे दिलीप प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दीड तासांचा हा प्रयोग त्यांनी फार जास्त रंगवला होता. त्यावेळी “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?” असे बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, असा किस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका रंजक वळणावर, नेहा आणि यशचा साखरपुडा लवकरच पार पडणार

दरम्यान दिलीप प्रभावळकर यांनी दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला आहे. विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून त्यांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत.