कारगिल युद्धाच्या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत एक किस्सा घडला होता. रवीनाचे नाव लिहिलेला एक बॉम्ब पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान नवाब शरीफ यांना पाठवण्यात आला होता. यावर आता रवीनाने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवर लाइव्ह चॅट दरम्यान रवीनाला एका यूजरने या घटनेबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर रवीनाने उत्तर देत याबाबत तिला फार उशिरा माहिती मिळाली होती असे सांगितले. ‘एखाद्या आईला तिच्या मुलांना गमावल्यानंतर आनंद होत नाही. कारण बॉर्डच्या दोन्ही बाजूला देशातील लोकांचे रक्त वाहते’ असे रवीना म्हणाली.
अल्लू अर्जुन ते महेश बाबू; जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सचे मानधन

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During kargil war bombs sent to pakistani pm nawaz sharif by raveena tandon name avb
First published on: 26-01-2022 at 10:03 IST