Entertainment News Updates, Celebrity News : सध्या महाराष्ट्रात अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा बराच गाजताना दिसत आहे. केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत तिच्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंहच्या गंमतीशीर विनोदामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासोबतच मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड करण्यात आली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.