सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल धनुष आणि ऐश्वर्या हे चर्चेत आहे. या चर्चा त्यांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला आहे. पण त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न देखील अनेकांना सतावत आहे. आता त्यांच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, धनुष हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये सतत व्यग्र असतो. तो सतत बाहेर असतो. यासर्व गोष्टींमुळे त्याला पत्नी ऐश्वर्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुष हा सतत कामात व्यग्र असतो. तो नेहमी कामाचा पहिले विचार करतो आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना याबाबत माहिती आहे. काही वर्क कमिटमेंटमुळे त्याने कुटुंबीयांकडे फारसे लक्ष दिलेले नाही. तो सतत शूटिंगसाठी अनेक ठिकाणी फिरत असतो. ऐश्वर्यासोबत वाद सुरु असताना देखील धनुष नवे चित्रपट साइन करत होता. विभक्त होण्यापूर्वी त्यांनी बराच विचार केला होता.
आणखी वाचा : ‘घटस्फोट सेलिब्रेट करा’, धनुष-ऐश्वर्या विभक्त होताच राम गोपाल वर्माने केले ट्वीट

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is the reason why dhanush and aishwaryaa rajinikanth get seperated avb
First published on: 19-01-2022 at 10:16 IST