गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकाच्या अग्निपथ योजनेचा बरेच लोक विरोध करत आहेत. या योजनेविरोधात देशभर आंदोलनं आणि जाळपोळ सुरु झाली आहे. यासगळ्यात बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने सरकारची बाजू घेतली आहे.

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अग्निपथ योजने अंतर्गत सैन्यात भर्तीच्या सरकारच्या निर्णयाला कंगनाने पाठिंबा दिला आहे. “इस्रायलसारख्या देशांमध्ये आपल्या तरुणांना लष्कराचं प्रशिक्षण घेणं जरुरीचं केलं आहे. प्रत्येक जण काही वर्ष तरुणांना लश्कर प्रशिक्षण देतं. त्यामुळे शिस्त, राष्ट्रवाद आणि देशाच्या सीमेचं संरक्षण करण्याचं महत्त्व कळतं. अग्निपथ योजनेचा उद्देश फक्त करिअर करणं, पैसे कमावणं नाही. त्यापेक्षाही ते सखोल आहे,” असे कंगना म्हणाली.

आणखी वाचा : “तू देशाचा पंतप्रधान आहेस का?”, मुस्लिमांची बाजू घेतल्यामुळे विशाल दादलानी झाला ट्रोल

kangana ranaut, agnipath scheme,
कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (Photo Credit : Kangana Ranaut Instagram)

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ची यशोगाथा आता उलगडणार छोट्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पुढे कंगना म्हणाली, “पूर्वी प्रत्येक व्यक्ती गुरुकुलमध्ये जात असत आणि असच हे देखील आहे. एवढंच काय तर याचे पैसेही मिळणार आहेत. ड्रग्स आणि पबजीमुळे आताची पिढी बरबाद होते आणि या योजनेची गरज आहे. या योजनेसाठी सरकारचं कौतुक केलं पाहिजे.”

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

नुकताच कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. आता कंगना ‘तेजस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कंगना ‘इमर्जन्सी’ सिनेमाचं शूटिंगही करतेय. इंदिरा गांधींवरच्या या चित्रपटात ती त्यांचीच भूमिका साकारणार आहे. कंगना ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत.