छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय आणि चर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नाही तर त्यांच्या ज्ञानातही मोठी भर पडते. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे गेली अनेक वर्षे या शोचे सूत्रसंचालन करतात ही आणखी आकर्षणाची गोष्ट. अमिताभ यांच्या मनमोकळ्या संवादामुळे ते नेहमीच स्पर्धकांना अधिक जवळचे वाटतात. ते नेहमीच स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतात. तर स्पर्धकही आपला आनंद, दुख: आणि अडचणी त्यांच्यासोबत शेअर करतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये देखील पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. ‘कौन बनेगा करोडपती'च्या कालच्या भागात मनीषा अमिताभ यांच्याशी गप्पा मारताना दिसली. यावेळीस तिने बिग बी यांना तिच्या संघर्षा बद्दल सांगितले, ती म्हणाली, तिला अंधाराची भिती वाटते. तसंच ती आयुष्यभर तिच्या कुटुंबावर अवलंबून राहिली आहे. मात्र आता ती स्वावलंबी आहे स्वतःची काळजी घेऊ शकते, असे तिने सांगितले.. या वेळीस बिग बी यांनी वातावरणातील ताण कमी करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातली माहीत नसलेली गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. अमिताभ हे घरी दिवे लावून झोपतात, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मला पण अंधाराची भिती वाटते… आणि घरी मी लाइट्स ऑन करुन झोपतो मला भिती वाटते की कोणी माझी चादर घेऊन गेलं तर..?" अमिताभ नेहमीच स्पर्धकांना सपोर्ट करत त्यांना आधार देताना दिसतात. त्याच्या या मजेशीर किस्स्यामुळे सेटवरील वातावरण हलके-फुलके झाले. सर्वत्र हास्याची लाट पसरली. मनीषा शर्माने कालचा एपिसोड संपण्या आधी २ लाईफ लाइनचा वापर करत ६ प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तिने आता पर्यंन्त १० हजार रुपये जिंकले आहेत. आजच्या भागात ती किती रुपये जिंकेल हे आज येणाऱ्या भागात कळेल. त्यामुळे हा भाग बघण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.