सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee with karan 7) ची जोरदार चर्चा आहे. शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. करोनाच्या संकटानंतर करण जोहरचा शो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि त्यातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आणि सेक्स लाइफबद्दल बरेच खुलासे झाले. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले.

‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीर सिंगने त्याच्या सेक्स लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विशेषतः बिंगो गेममध्ये रणवीर सिंगने लग्नाच्या पहिल्या रात्री देखील सेक्स केल्याची कबुली दिली. एवढंच नाही तर त्याने सांगितलं की, “आम्ही हे आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत.” करण जोहरने रणवीरला, “लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत तू थकला नव्हतास का?” असा प्रश्न विचारल्यावर रणवीरनं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, “नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो.”

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

या शोमध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्री आलिया भट्टने देखील हजेरी लावली होती. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल बोलताना आलिया म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो. त्यामुळे ‘सुहागरात’ नावाची कोणतीही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री नसते. लग्नाच्या बाबतीत हे सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे. पण हे सगळं रणवीरला लागू होत नाही. तो नेहमीच उत्साही असतो.”

आपल्या शोबद्दल बोलताना करण म्हणाला, “आम्हाला २ वर्ष एक कोठडी बंद करून ठेवण्यात आलं होतं. मी बरंच काही केलं पण त्या काळात कोणतीही गोष्ट सोपी नव्हती. जेव्हा या शोचं नावं घेतलं जायचं तेव्हा लोकांच्या नकारात्मक कमेंट येत असत. अशीही वेळ आली होती जेव्हा मला हा शो पुन्हा कधीच करू शकणार नाही असं वाटत होतं.” यावर रणवीर म्हणाला, “हे सगळं चुकीचं आहे आणि या सगळ्यात कोणतंही तथ्य नव्हतं.”

दरम्यान या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. त्याचं हे वागणं पाहून आलिया भट्ट आणि करण जोहर दोघंही हैराण झाले होते. याशिवाय रणवीरने आपल्या हुशारीच्या जोरावर रॅपिड फायर राउंडचं हॅम्पर देखील जिंकलं.