बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. मात्र, यावेळी केआरकेने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे केआरकेने कॉंग्रेसला टोला लगावला आहे. तर ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “देशद्रोही हा माझा चित्रपट राज ठाकरे साहेबांनी प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी पाहिला होता. त्यातले काही दृश्ये हटवण्यास त्यांनी मला सांगितले आणि मी नकार दिला. मग राज साहेबांनी मला सांगितले की ते माझ्या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालतील आणि त्यांनी ते २ दिवसात केले. मी विचार करत होतो की त्यांना हे करणे शक्य होणार नाही कारण त्यावेळी काँग्रेसचसी सरकार होती”, असं म्हणतं केआरकेने कॉंग्रेस पार्टीला टोला लगावला आहे.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.