अभिनेता महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता आहे. महेश बाबू सध्या खूप चर्चेत आहे. ‘सरकारु वारी पाता’ हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमादरम्यान, त्यावेळी महेशला हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याबद्दल प्रश्न केला होता. त्यावर तो म्हणाला की, बॉलिवूडला तो परवडणार नाही. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. आता या प्रकरणावर महेश बाबूने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

यावर स्पष्टीकरण देत महेश बाबू म्हणाले, “मला सिनेमा आवडतो आणि मी सर्व भाषांचा आदर करतो. मी जिथे चित्रपट करतो आहे तिथे काम करायला मला कम्फर्टेबल आहे. तेलगू सिनेमांना पसंती मिळत असल्याचे माझे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. याशिवाय, त्यांनी हे देखील सांगितले की त्यांचा पुढील चित्रपट एसएस राजामौली यांच्यासोबत असणार आहे आणि तो एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. असे बोलत महेश बाबूने त्याच्या शैलीत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा : “….एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी केली खास पोस्ट शेअर

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

काय म्हणाला होता महेश बाबू…

महेश बाबू या अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी चर्चा करत असताना, “मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही. जो स्टारडम किंवा आदर मला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळतो तो फार मोठा आहे. त्यामुळे मी माझी सिनेसृष्टी सोडण्याबद्दल कधीच विचार शकत नाही. मी नेहमीच चांगले चित्रपट करायचा आणि ते हिट होण्यासाठी प्रयत्न केला आहे. माझी स्वप्ने आता पूर्ण होत आहेत. मला आता अधिक आनंदी व्यक्ती बनायचे नाही”, असे महेशबाबू म्हणाला.