बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र नुकतंच एका मुलाखतीत तिने अरबाज खान आणि घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

मलायकाने नुकतेच बॉलिवूड बबल या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी तिला अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, “अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिच्यावर प्रचंड कौटुंबिक दबाव होता. घटस्फोटानंतर मी या सर्व गोष्टींना कशाप्रकारे सामोरे जाईन, त्याचा मुलावर कसा परिणाम होईल आणि याबाबत समाजाचा दृष्टीकोन कसा असेल याची तिला चिंता वाटत होती. तसेच हे सर्व मला पुढे अशाचपद्धतीने सुरु ठेवता येईल का?” याचीही तिला भीती वाटत होती.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

“माझ्या मनात एक ना अनेक गोष्टी सुरू होत्या. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता असे मला वाटते. या एका निर्णयामुळे माझ्या संपूर्ण आयुष्यात गोंधळ उडाला आणि मला या बदलाला सामोरे जावे लागले कारण त्यात माझी मुले आणि माझे कुटुंब सहभागी होते. त्यात फक्त मी एकटी नव्हते. यामध्ये अनेक पैलूंचाही समावेश होता,” असे मलायका म्हणाली.

यापुढे मलायका म्हणाली की, “जेव्हा तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या मनात अनेक गोष्टी सुरू होत्या. माझ्या या निर्णयाचा माझ्याशी संबंधित लोकांवर परिणाम होणार होता. शेवटच्या क्षणी आम्ही दोघेच होतो. आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र होतो. हे सर्वोत्तम आहे असे आम्हाला वाटत होते. पण ते सर्वात कठीण होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.”

ताज हॉटेलमध्ये पत्नीसोबत डिनर करताना गोविंदाने केला होता आईला फोन, म्हणाला “मी दारु…”

मलायका अरोरा सध्या मुलगा अरहानसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहे. अरहान नुकताच सुट्टीवर घरी परतला आहे. तो परदेशात शिकत आहे. १० डिसेंबरला अरहान मुंबईला परतला होता. मलायकासोबत अरबाज खानही मुलाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. यावेळी अरबाज खानने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली होती.