छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची पात्र अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडली होती. नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावर प्रेक्षकांसह मालिकेतील अनेक कलाकारांनी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतंच हृता दुर्गुळे हिने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृता दुर्गुळे हिने या मालिकेत दीपिका देशपांडे हे पात्र साकारले होते. मालिका संपल्यानंतर हृताने मालिकेतील एका रोमँटिक क्षणाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. याला तिने खास कॅप्शनही दिले आहे. “मला मिळालेल्या या संधीसाठी मी झी मराठीची कायमच कृतज्ञ असेन. माझ्यातील काहीसा भाग मागे ठेवत आहे. पण काही सर्वोत्तम माणसांसोबतच्या अनेक आठवणी माझ्यासह घेऊन जातेय”, असे तिने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.
‘मन उडू उडू झालं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आले समोर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man udu udu zhala tv serial off air hruta durgule ajinkya raut share emotional note nrp
First published on: 14-08-2022 at 09:10 IST