राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. तर दुसरीकडे या राजकीय उलथापालथीनंतर केदार शिंदे, पराग कान्हेरे, आरोह वेलणकर यांसारखे अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच या संपूर्ण घटनेवर अभिनेता आस्ताद काळे याने भाष्य केले आहे.

अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध मुद्द्यांवर त्याची वैयक्तिक मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळे याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण…..”, असे आस्ताद काळने म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले “नाटक सुरु…”

आस्ताद काळेच्या या पोस्टवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रातील ED कार्यालय आता बंद होतील….आता ED वालेही बेरोजगार …’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषदेच्या सदस्य पदाचा देखील राजीनामा…साहेब हा महाराष्ट्र आपला कायम ऋणी असेल…’, असे एकाने कमेंट करताना म्हटले आहे.

दरम्यान महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात शिवसेनेनं बंडखोर १६ आमदारांना निलंबित केल्याची याचिका न्यायप्रविष्ठ असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. या बहुमत चाचणीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

“आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेत्यानं केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.