छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी याचा मन फकीरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला असून अभिनेत्री सायली संजीवने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केलं असून तिच्यासोबत काम करण्याचा नेमका अनुभव कसा होता हे सुव्रतने ‘लोकसत्ता’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.

वाचा : Video : मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही – विक्रम गोखले

या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयीने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाची कथा मृण्मयीने सात वर्षांपूर्वीच लिहिली होती. या सात वर्षांच्या मेहनतीनंतर तिचा ‘मन फकीरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला.