२०२२ हे वर्षं संपत आलं आहे आणि हे वर्षं एकूणच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी तितकं खास ठरलेलं नाही. दोन्ही भाषेत बरेच चांगले चित्रपट आले पण तेवढेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशीदेखील ठरले. या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी ‘Galatta Plus’ द्वारे आयोजित गोलमेज संवादात बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी सहभाग घेतला होता. या मुलाखतीची चर्चादेखील सोशल मीडियावर चांगलीच झाली.

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माते अनुराग कश्यप आणि करण जोहर, दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान आणि कार्थी, केजीएफ स्टार श्रीनिधी शेट्टी, अभिनेत्री पूजा हेगडे, बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांनी या मुलाखतीत हजेर लावली. याच दिग्गज मंडळींबरोबर मराठी चित्रपटसृष्टीबद्दल खुलासा करण्यासाठी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये निपुणने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

आणखी वाचा : ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध

यावर्षी निपुण धर्माधिकारीचा ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सगळीकडूनच याला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकप्रिय शास्त्रीय संगीत गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला लोकांनी उचलून धरलं, तरी म्हणावा तसा या चित्रपटाला प्रतिसाद न मिळाल्याची खंत निपुणने या मुलाखतीमध्ये व्यक्त केली. तसंच हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

निपुण म्हणाला, “मी वसंतराव पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळपास ९ वर्षं लागली. त्यादरम्यान आम्ही इतर प्रोजेक्ट केले, पण पैशाचं गणित नीट बसत नसल्याने हा चित्रपट बनवायला वेळ लागला. तोवर मी कोणताही चित्रपट केला नाही, राहुल देशपांडेनेही कोणताही चित्रपट केला नाही. तेव्हा कुणीच आमच्यावर विश्वास टाकला नाही. आता विचार करतो तेव्हा ही रक्कम छोटी वाटते, पण तेव्हा केवळ ४ कोटी कमी पडत असल्याने आम्हाला तो चित्रपट पूर्ण करायला वेळ लागला. अर्थात आम्ही यातूनही मार्ग काढत चित्रपट केला आणि लोकांना तो पसंत पडला.” निपुणने याआधी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय तो ‘इश्क विश्क रीबाउंड’ या आगामी हिंदी चित्रपटाचंसुद्धा दिग्दर्शन करणार आहे.