नाटक, मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा संकर्षण कऱ्हाडे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमात त्याने सादर केलेली राजकीय परिस्थितीवरील कवितेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘लोकशाही जिवंत ठेवा’ या कवितेतून अभिनेत्याने कुठल्याही पक्षाचा किंवा नेत्याचा उल्लेख न करता राजकारणावर चपखल भाष्य केलं आहे. यावरून सध्या संकर्षणचं कौतुक होतं आहे. पण संकर्षणला ही कविता कशी सुचली? त्याला ही कविता लिहिण्यासाठी किती दिवस लागले? नेमकी या कवितेमागची गोष्ट काय आहे? जाणून घ्या…

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ‘लोकशाही जिवंत ठेवा’ कविता पहिल्यांदा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’च्या नाशिकच्या प्रयोगात सादर केली होती. त्यानंतर ठाण्याच्या प्रयोगात सादर केली. ही कविता सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी दोन-अडीच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला होता. एवढंच नव्हेतर त्या कवितेची दखल सर्व पक्षांच्या आजी-माजी ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांनी घेतली. फोन करून सोशल मीडियाद्वारे संकर्षणचं कौतुक केलं.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान

हेही वाचा – “निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्सशी’ बातचित करताना संकर्षण कऱ्हाडेनं ‘लोकशाही जिवंत ठेवा’ कवितेमागची गोष्ट सांगितली. तो म्हणाला सांगितलं, “मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आणि डोक्यात आपोआपच पक्ष, निवडणुका, मतदान, लोकशाही यांचा एकंदरीत विचार घोळू लागला. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीबद्दचे विचार मनात येत होते. गेले दहा-पंधरा दिवस काम झालं की, रोज रात्री याबद्दल लिहायचा प्रयत्न करत होतो. पण मनासारखी भट्टी जमून येत नव्हती.”

हेही वाचा – ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात सलमान खान झळकणार होता ‘या’ भूमिकेत, महेश मांजरेकर खुलासा करत म्हणाले, “त्याला…”

पुढे संकर्षण म्हणाला, “कोणत्याही नेत्यांची नावं न घेता आणि अमुक एका पक्षावर लक्ष्य न करता कविता करायची होती. मग विचार आला की, एखाद्या घरात वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देणारे कसा विचार करत असतील. सध्याची राजकीय स्थिती बघून त्यांना काय वाटत असेल? या सगळ्यांचा एकंदरीत विचार कवितेतून यायला हवा. शिवाय कवितेत राजकीय संदर्भ देताना कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हता. १० ते १५ दिवसांच्या प्रयत्नांनंतर साधारण आठवड्याभरापूर्वी ‘लोकशाही जिवंत ठेवा’ ही कविता जमून आली.”

Story img Loader