छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून स्वाभिमान मालिकेला ओळखले जाते. स्वाभिमान ही मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. स्वाभिमान ही मालिका स्त्री केंद्रीत विषयांवर आधारित आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका हरहुन्नरी तरुणीची कथा उलगडली जात आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच या मालिकेत शांतनू हा पल्लवीसोबत साखरपुडा करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

स्वाभिमान या मालिकेत लवकरच उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या शांतनू आणि पल्लवी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र अजूनही त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही. तर दुसरीकडे निहारिका ही शांतनूसोबत लग्न करण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

सध्या या मालिकेत शांतनू आणि निहारिकाच्या लग्नाची तयारी सुरु आहे. घरात सुरु असलेली लग्नाची तयारी पाहून शांतनू हा फारच वैतागलेला दिसत आहे. यावेळी तो घरात सुरु असलेली तयारी पाहतो आणि साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो. मात्र तो निहारिकासोबत नाही तर पल्लवीसोबत लग्न करणार आहे, असे सांगतो. यावेळीचा एक प्रोमो हा मराठी सिरियल या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता शांतनू आणि पल्लवीचा साखरपुडा होणार का? त्यांचे लग्न होणार का? असा प्रश्न समोर येत आहे.

कंगना रणौतच्या ‘Lock UPP’ चा नवा विक्रम, ४८ तासात मिळाले तब्बल इतके लाख व्ह्यूज

स्वाभिमान या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर, अभिनेता अक्षर कोठारी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत या मालिकेत आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.