मिस युनिव्हर्स ही गेली अनेक वर्ष जगभरात सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे. नुकताच या स्पर्धेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिष्ठित मिस युनिव्हर्स स्पर्धेत विवाहित महिलांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. २०२३ पासून विवाहित महिला आणि माता या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. यापुढे विवाह आणि पालकत्व यांचा स्पर्धकांच्या पात्रतेवर परिणाम होणार नाही.

आणखी वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण

world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

आत्तापर्यंत, मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या नियमांमध्ये असे सांगितले होते की, मिस युनिव्हर्स विजेते हे अविवाहित असले पाहिजेत आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण कार्यकाळ विजेतेपदासह राहील. त्याचप्रमाणे विजेत्यांनी मिस युनिव्हर्स म्हणून राज्य करताना गर्भवती होऊ नये अशी अपेक्षा केली जाते, परिणामी मातांना वगळले जाते.

मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करत मिस युनिव्हर्स २०२० चा मुकुट पटकावलेल्या आंद्रिया मेझाने या नवीन नियम बदलाचे स्वागत आहे. तिने ‘इनसाइडर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत घेतलेला हा नवीन निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय मला प्रामाणिकपणे आवडला. जसा समाज बदलत आहे आणि स्त्रिया आता नेतृत्वाच्या पदांवर विराजमान होत आहेत जे पूर्वी फक्त पुरुषच करू शकत होते. आता स्पर्धेचे नियमही बदलले आणि कुटुंब असलेल्या महिलांसाठी ही स्पर्धा खुली झाली.”

हेही वाचा : बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

भारताच्या हरनाझ कौर संधूने मिस युनिव्हर्स २०२१ च्या मुकुटावर आपले नाव कोरले. पंजाबस्थित हरनाझ संधूने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या ७० व्या मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरनाझ सिंधू ही मिस युनिव्हर्स हा किताब पटकावणारी तिसरी भारतीय ठरली. त्यापूर्वी १९९४ मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हा किताब मिळाला होता तर २००० मध्ये लारा दत्ता ही मिस युनिव्हर्स ठरली होती.