आज छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका आहेत, पण कुठेतरी सर्व मासिकांचा आशय सासू- सूनांच्याभोवती फिरतो. कदाचित यामुळेच कोणताही शो प्रेक्षकांवर जादू करण्यात काही प्रमाणात अपयशी ठरला आहे. पूर्वी रामायण, महाभारत आणि शक्तीमान सारख्या मालिकादेखील होत्या, ज्यांची प्रेक्षकांवर इतकी प्रचंड पकड होती की संपूर्ण कुटुंब टीव्हीसमोर बसून या मालिका पाहत असे. लोक या मालिका मनापासून पाहायचे. दरम्यान, आता ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी सासू-सूनांच्या मालिकांबद्दल आपलं मत मांडलं आहे.

मुकेश खन्ना त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतीच त्यांनी सासू- सूनांच्या मालिकांबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी निर्माती एकता कपूरवर संताप व्यक्त केला असून या सासू- सूनांच्या मालिकांनी संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. मुकेश खन्ना यांची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित

आणखी वाचा- Video : “मोगॅम्बो कभी खुश नहीं होगा क्योंकि…” Bigg Boss 16 चा नवा प्रोमो चर्चेत

टीव्हीवरील सासू- सूनांच्या मालिकांबद्दल बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “सॅटेलाइट टीव्हीचा सॅच्युरेशन पॉइंट आला आहे. प्रत्येकजण फक्त एकमेकांची नक्कल करत आहेत. टिकली, झुमका, हार, साडी, लहंगा, सासू, सून, नणंद, वहिनी आणि मुलींचे साम्राज्य सुरू आहे. सर्व चॅनेलची हीच स्थिती आहे. प्रत्येक मालिकेत कलाकार क्रूर भाव घेऊन फिरत असतात. मी काही वर्षांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेने टीव्ही जगताचा सत्यानाश केला आहे.” अर्थात सर्वांना माहीत आहे की ही मालिका एकता कपूरची होती.

आणखी वाचा- “ते आदाब करत आहेत की, बर्बाद..”; पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन मुकेश खन्नांची बॉलिवूड स्टार्सवर जोरदार टीका

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “सासू आणि सून यांच्या या मालिकांमध्ये टीव्ही कुठेतरी हरवला आहे. दुःखद, पण हे खरे आहे. काहीतरी नवीन करण्याची आणि विचार करण्याची गरज आहे.” मुकेश खन्ना सांगतात की, “मी पंकज बेरी यांचे एक विधान वाचले होते, ज्यामध्ये त्यांनी सासू- सूनांच्या मालिकांमध्ये टीव्ही कुठेतरी गायब झाल्याचे म्हटले होते. हे वाचून कुठेतरी बरं वाटतंय. कारण मी ही गोष्ट काही वर्षापूर्वीच बोललो होतो.”