स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात ही मालिका निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता या मालिकेने यशस्वीरित्या ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. मुलगी झाली हो मालिकेतील साजिरी आणि शौनक ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. यात साजिरीची भूमिका दिव्या पुगावकर साकारताना दिसत आहे. तर शौनकची भूमिका योगेश सोहनी साकारत आहे. त्या दोघांमधील केमिस्ट्री अनेकांना आवडत आहे. योगेश हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याच्या आनंदात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. योगेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. यातील व्हिडीओत त्याने मालिकेतील सर्व कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत. “चित्रपटात काम करण्यासाठी तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा "आज सादर झाला 'मुलगी झाली हो' मालिकेचा ५०० वा एपिसोड… आपण या ५०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!", असे योगेशने म्हटले आहे. "आज "मुलगी झाली हो" या माझ्या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. ह्या संपूर्ण प्रवासात काही अत्यंत आनंदचे तर काही अतिशय खडतर असे क्षण आले. या सगळ्या प्रवासात मायबाप रसिक प्रेक्षकांची म्हणजेच तुमची साथ खूप महत्त्वाची होती, या तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळेच हे शक्य झालं आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचा लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा हीच प्रार्थना", असेही योगेश सोहनी म्हणाला. “मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना रातोरात काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे ही मालिका चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण मानेंनी केला होता. मात्र स्टार प्रवाह वाहिनी व मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांचा हा आरोप धुडकावून लावत त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं होतं.