१९९०मध्ये काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना आपली घरं-दारं सोडून बाहेर पडावं लागल्याच्या घटनेचं चित्रण करणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आणि काहीसा वादात सापडला आहे. या चित्रपटातल्या विषयावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, असं म्हटलं असताना तो टॅक्सफ्री करण्याची मागणी होऊ लागली आहे. दुसरीकडे काही राज्यांनी याला विरोध केला आहे. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी या चित्रपटावर आणि वादावर परखड भूमिका मांडली आहे.

नाना पाटेकर यांनी पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

“चित्रपट मी पाहिलेला नाही, पण…”

“हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

“मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे”, असं देखील नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…”

“चित्रपटातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना…”

“मला वाटतं की ही तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाही. ही तेढ कुणी जाणूनबुजून निर्माण करत असेल, तर त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा. सगळे छान सलोख्यानं राहात असताना मध्येच कुठेतरी बिब्बा घालायचा याची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यामुळे त्यावरून गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे योग्य नाही”, अशा शब्दांत नाना पाटेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“आपल्याला एकमेकांचा आधार वाटणं गरजेचं आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असं जोपर्यंत दोन्ही समाजांना, तुम्हा-आम्हा भारतीयांना वाटत नाही, तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला की सगळे लगेच भारतीय होतात. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात? त्यामुळे सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचं”, असं देखील नाना पाटेकर यावेळी म्हणाले.