रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव ही तत्त्वं ज्या देशाचा पाया आहे असा आपला देश सध्या ‘हिंदुत्ववादी’ म्हणून नवी प्रतिमा अंगीकारतो आहे. सहिष्णुता हा ज्या देशाचा पिंड होता आणि आहेही, त्या भारतात आज सर्रास अन्यधर्मीयांचे दमन सुरू आहे. धाकदपटशा ही आपली संस्कृती बनत चालली आहे. आणि एकेकाळी वैचारिक मतभेद चर्चा करून सोडवले जात होते तिथे आता हिंसेची भाषा बोलली जात आहे. ‘पुरोगामी’ ही आता शिवी मानली जाऊ लागली आहे. आणि देशाला वैचारिक दिशा देणारे विचारवंत या परिस्थितीने पार कोशात गेले आहेत. त्यांची ही स्थिती, तर मग सामान्य माणसांचं काय? ते तसेही जगण्याच्या संघर्षांत गलितगात्र झालेले असतातच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natayrang drama stage charcha tar honarch secularism pantheism hindutva tolerance culture ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST