रेश्मा राईकवार
एखादा गोष्टीवेल्हाळ, एखादा कवितेवर प्रेम करणारा, एखादा भवतालाच्या सौंदर्यात हरवणारा.. व्यक्तिगणिक अंतरंगात वेगळे भाव घेऊन जगणारे असे कितीक आपल्या आजूबाजूला असतात. आपल्याच माणसाच्या अंतरंगात शिरून त्याला समजून घेण्याइतका संयम आपल्याकडे बव्हंशी नसतो.. मग उरतो तो कोरडा संवाद. सध्याच्या काळात या कोरडया संवादापलीकडे जात आपलीशी वाटणारी माणसं घट्ट धरून ठेवायला हवीत, हे सांगणारी जगण्याची अर्थपूर्ण गोष्ट म्हणजे ‘एकदा काय झालं’..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘ एकदा काय झालं’ हा चित्रपट त्यांच्या या आधीच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. कथा-कल्पना आणि मांडणीतला साधेपणा, सच्चेपणा कायम ठेवत गोष्टीतली गोष्ट रंगवण्याचा प्रयोग या चित्रपटात दिग्दर्शकाने केला आहे. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची ही गोष्ट आहे. त्यामुळे त्याची चित्रपटीय मांडणीही गोष्टींचं जग उभी करणारी आहे. गोष्टी सांगणारा नायक, त्याच्या गोष्टीत हरवून जाणारा त्याचा मुलगा, त्याची शाळा, आजूबाजूला गोष्टींची पुस्तकं, लहान मुलांची आवडती कार्टून्स अशी थोडी परिकथांकडे झुकणारी मांडणी चित्रपटात दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poems beauty personal screenplay dialogue direction music amy
First published on: 07-08-2022 at 00:03 IST