आज देश रडत आहे. लता मंगेशकर यांनी नवीन गायिका म्हणून ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले होते त्या दिवशीही देश रडला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातही अश्रू आले होते. लतादीदींचे हे अजरामर गाणे कवी प्रदीप यांनी लिहिले आहे. कवी प्रदीप यांचे हे गाणे लतादीदींच्या सुरात अजरामर झाले आणि आजतागायत प्रत्येकाला ते आवडते. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या गाण्याला कवी प्रदीप यांनी लिहालं आणि गायलं होत. या गाण्यामुळे आज तिघेही अजरामर आहेत – लता जी, कवी प्रदीप आणि या दोघांनी गायलेले हे गाणे.

लता मंगेशकर यांच्या निधनाने शोक व्यक्त करणाऱ्या देशासाठी हेही महत्त्वाचे आहे की, आज कवी प्रदीप यांचीही जयंती आहे. ज्या कवी प्रदीप यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ हे गाणे लिहिले. आज भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक अद्भुत योगायोग घडला आहे. आज लता मंगेशकर यांनी जगाला निरोप दिला आहे, आजपासून लता मंगेशकर आपल्यात नाहीत आणि याच दिवशी १०७ वर्षांपूर्वी देशभक्तीची भावना जागवणारे कवी प्रदीप यांचा जन्म झाला होता.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Shiv Sena Shinde campaign song
Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध

(हे ही वाचा: Lata Mangeshkar: लता मंगेशकरांना ‘या’ गाड्यांची होती आवड; कुटुंबासाठी मागे ठेवलीये इतकी संपत्ती)

कवी प्रदीप यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी मध्य प्रदेशातील बडनगर येथे झाला. ११ डिसेंबर १९९८ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. कवी प्रदीप यांना बालपणी रामचंद्र नारायण द्विवेदी या नावाने ओळखले जात होते.कवी प्रदीप यांची ओळख १९४० मध्ये रिलीज झालेल्या बंधन या चित्रपटाने झाली. पण त्यांना खरी प्रसिद्धी १९४३ मध्ये आलेल्या किस्मत चित्रपटातील ‘दूर हटो ए दुनिया वाला हिंदुस्तान हमारा है’ या गाण्याने मिळाली. या गाण्याने त्यांना देशभक्तीपर गीतांच्या निर्मात्यांमध्ये अजरामर केले. हे गाणे समजून घेताना तत्कालीन ब्रिटिश सरकार इतके भडकले की ते टाळण्यासाठी कवी प्रदीप यांना भूमिगत व्हावे लागले होते.

(हे ही वाचा: Lata Mangeshkar: लता मंगेशकरांच्या नावे होता ‘हा’ अनोखा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

अमर गाणे सिगारेटच्या पाकिटावर लिहले होते

लता मंगेशकर आणि कवी प्रदीप यांची जोडी अजरामर होण्याचे कारण म्हणजे ए मेरे वतन के लोगों… या गाण्याची कथाही योगायोगाचीच आहे. खरं तर, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर, चित्रपट उद्योगाने लष्कराच्या जवानांना आर्थिक मदत करण्यासाठी एक चॅरिटी शो आयोजित केला होता. हा शो २७ जानेवारी १९६३ रोजी होणार होता. या शोमध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि राष्ट्रपती राधाकृष्णन येणार होते.

(हे ही वाचा: Lata Mangeshkar: गानकोकिळा ते भारतरत्न; अमृत स्वरांनी अजरामर झालेला लतादीदींचा सुरेल प्रवास)

या मैफलीसाठी दिग्गज कलाकारांना पाचारण करण्यात आले होते. यात मेहबूब खान, नौशाद, शंकर-जयकिशन, मदन मोहन आणि सी. रामचंद्र या नावांचा समावेश होता. सी रामचंद्र चांगले संगीतकार होते पण त्यांना या प्रसंगासाठी गाणे मिळत नव्हते. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झालेले कवी प्रदीप यांच्यापर्यंत पोहोचले. असे म्हणतात की, एका प्रसंगी कवी प्रदीप यांनी त्यांना टोमणा मारला आणि ‘फुकटचे काम असेल तर येता’ असे सांगितले. पण त्यांनी गाणे लिहिण्याचे मान्य केले.

(LIVE UPDATE: Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन)

मग एके दिवशी कवी प्रदीप मुंबईत माहीम इथल्या समुद्रकिनायवर फिरत होते. तेव्हा त्यांनी एका व्यक्तिकडून पेन मागितला आणि त्यांनी सिगरेटच्या पाकिटावर ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गाण लिहिलं. फक्त, २७ जानेवारी १९६३ रोजी नवी दिल्लीत ही मैफल झाली तेव्हा या कार्यक्रमाला कवी प्रदीप यांना आमंत्रित केले गेले न्हवते. प्रदीप आज नाहीत आणि लताजीही नाहीत. पण हा विचित्र योगायोग आपल्याला नक्कीच हैराण करून सोडतो. दोघांचेही आपल्यासोबत नसतील, पण त्यांचे सांस्कृतिक योगदान पुढील पिढ्यांवर प्रभाव टाकत राहील.