देशातील पेड मीडियामुळे या क्षेत्राने विश्वासार्हता गमावल्याचे मत अभिनेत्री प्रीती झिंटाने मांडले आहे. टि्वटरवर आयोजित करण्यात आलेल्या एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात प्रीती सहभागी झाली होती. या कार्यक्रमादरम्यान मीडिया नकारात्मकता पसरवत असल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना देशातील पेड मीडियामुळे या क्षेत्राने विश्वासार्हता गमावल्याचे ती म्हणाली. पेड मीडिया एखाद्या कर्करोगाप्रमाणे पसरत असून, यामुळे भारतीय माध्यमक्षेत्राची विश्वासार्हता नष्ट होत चालली असून ही बाब दुर्देवी असल्याचे मत तिने व्यक्त केले..