बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राजकुमार राव हा अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्याची प्रेयसी पत्रलेखासोबत विवाहबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यासोबत ते दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? याबद्दल सांगितले आहे.

नुकतंच इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट २०२२ या कार्यक्रमादरम्यान राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. यावेळी राजकुमार राव म्हणाला, “मी पत्रलेखाला घरातल्या कामात मदत करतो. मी घरात सर्वसामान्यांप्रमाणे वावरतो. मी पडद्यावर नेहमी खऱ्याखुऱ्या भूमिका साकारतो. त्यामुळे घरात तसेच असणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

राजकुमार राव आणि पत्रलेखा ‘या’ अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

“मी आणि पत्रलेखा एकत्र घरकाम करतो. मला सर्व काही नीटनेटके ठेवायला आवडते. मी अनेकदा तिने नीट केलेल्या सर्व गोष्टी पुन्हा व्यवस्थित लावून ठेवतो. मला भांडी घासणे आणि झाडू मारणे ही काम करणे आवडते. त्यातही मला भांडी घासायला आवडतात”, असे राजकुमार म्हणाला.

पाहा व्हिडीओ –

“मी लहान असताना आईसोबत ही काम करायचो. माझी आई एकटी ती सर्व काम करत असल्याचे पाहून मला फार दु:ख व्हायचे. त्यामुळे मी ती काम करुन ठेवायचो. त्यावेळी मला झाडू मारणे किंवा साफसफाई करणे आवडायचे”, असेही त्याने सांगितले.

“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर…”, राजकुमार रावने दोन महिन्यानंतर केला वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा

राजकुमार आणि पत्रलेखा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वीच ते लग्न बंधनात अडकले.