रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं लग्न टॉक ऑफ द टाऊन होतं. बरेच वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर रणबीर-आलिया लगेचच त्यांच्या कामावरही रुजू झाले. पण लग्नानंतरचं आयुष्य नेमकं कसं आहे? याबाबत रणबीरला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं. तेव्हा त्याने स्पष्टपणे आपलं मत मांडलं.

आणखी वाचा – कालीन भैय्या परत येतोय, ‘मिर्झापूर ३’चा उत्सुकता वाढवणारा व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर आयुष्यामध्ये काही बदल झाले का? असं रणबीरला नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, “लग्नानंतर आमच्या आयुष्यामध्ये फारसा मोठा बदल काही झाला नाही. आम्ही जवळपास ५ वर्षांपासून एकत्र आहोत. ५ वर्ष एकत्र राहिल्यानंतरच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सध्या आम्ही दोघंही आमच्या हातात असलेलं काम पूर्ण करत आहोत.”

पुढे बोलताना रणबीरने सांगितलं की, “लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. आलिया तिच्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणाला गेली आणि मी देखील माझ्या चित्रीकरणाला निघून गेलो. मी तर मनालीला चित्रीकरणासाठी गेलो होतो. ‘शमशेरा’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि आलिया लंडनवरुन पुन्हा परत आली की आम्ही आठवडाभराची सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. पण आता असं वाटतं की आमचं लग्न झालंच नाही आहे.”

आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ

रणबीर-आलियाने एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट केलं. दोघांनीही त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला. २०१७मध्ये ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये अधिक जवळीक वाढली. सध्या दोघंही आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच ‘ब्रम्हास्त्र’मधून आलिया-रणबीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.