अभिनेता रणबीर कपूरने ‘शमशेरा’च्या निमित्ताने ४ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. रणबीरची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला होता. परंतु या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना फारसे आवडले नाही आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट दणक्यात आपटला.

बॉलिवूडमधील फ्लॉप चित्रपटांच्या यादीतील ‘जग्गा जासुस’ आणि ‘बेशरम’ या चित्रपटांचे रेकॉर्ड देखील ‘शमशेरा’ने तोडले आहेत. या वर्षामधील यशराज प्रोडक्शनचा हा लागोपाठ चौथा फ्लॉप चित्रपट आहे. रणबीर कपूरसह निर्मात्यांनी ‘शमशेरा’ हा चित्रपट नक्की हिट होणार असा दावा केला होता.

salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

आणखी वाचा – ‘शमशेरा’च्या अपयशावर दिग्दर्शक करण मल्होत्रा अखेर बोलला, “मला तिरस्कार पचवणं…”

परंतु दोन आठवड्यातच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन १०.२५ कोटी रुपये होते. वीकएंडला कदाचित चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. पण तेव्हा सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. दोन आठवड्यात चित्रपटाने केवळ ४२.६५ कोटींची कमाई केली आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, करीना कपूर म्हणाली, “मला हा अधिकार…”

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ‘शमशेरा’च अपयश भरून काढत, ‘ब्रह्मास्त्र’मधून रणबीर पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.