बॉलीवूड गायक सोनू निगम बंगळुरूमधील कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने गायकाकडे कन्नड गाण्याची मागणी केली असता, सोनू निगमने त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली आणि त्यामुळेच सोनू निगमविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

हा वाद वाढत असल्याचे पाहून गायकाने कर्नाटकातील लोकांची माफी मागितली आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, त्याचे प्रेम अहंकारापेक्षा मोठे आहे. सध्या गायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर सोनू निगमने मागितली माफी

बंगळुरू कॉन्सर्टचा वाद वाढत असल्याचे पाहून सोनू निगमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, “सॉरी कर्नाटक.! तुमच्या लोकांवरील माझे प्रेम माझ्या अहंकारापेक्षा खूप मोठे आहे. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करतो.” खरं तर, सोनू निगमबद्दलचा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा एका तरुणाने त्याला बंगळुरूतील एका कॉन्सर्टमध्ये कन्नडमध्ये गाण्यास सांगितले. त्यानंतर सोनू निगमने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याने ही मागणी पहलगाममध्ये घडलेल्या घटनेशी जोडली. त्यानंतर त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल सोनू निगमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्याने या प्रकरणाबाबत आधीच स्पष्टीकरण दिले आहे आणि आता त्याने माफीही मागितली आहे.

बंगळुरूमधील कॉन्सर्टच्या वादावर स्पष्टीकरण देताना सोनू निगमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने लिहिले आहे, “त्याने केवळ कर्नाटकातच नव्हे, तर जगभरातील भाषा, संस्कृती, संगीत, संगीतकार, राज्य आणि लोकांना खूप प्रेम दिले आहे आणि मी गायलेली सर्वोत्तम गाणी कन्नडमध्ये आहेत. याचे पुरावे सोशल मीडियावरही उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. सोनू निगम म्हणाला, “तो असा तरुण नाही, जो कोणाचाही अपमान सहन करील. मी ५१ वर्षांचा आहे. मला वाईट वाटते की, त्याच्या मुलासारखा कोणीतरी तरुण भाषेच्या नावाखाली हजारो लोकांसमोर त्याला थेट धमकावतो आणि तेही कन्नडमध्ये. ही माझ्या कामाच्या बाबतीत दुसरी भाषा आहे”.

एवढेच नाही तर सोनू निगम पुढे लिहितो, “मी त्या मुलाला गप्प राहण्यास सांगत होतो. मी त्याला अतिशय विनम्रपणे व प्रेमाने सांगितले की, हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे आणि हे त्याचे पहिले गाणे आहे. तो त्यांना निराश करणार नाही; परंतु त्या बदल्यात त्यांना त्याला वेळापत्रकानुसार कॉन्सर्ट सुरू ठेवू द्यावा लागेल. तो म्हणाला की, प्रत्येक गायकाकडे गाण्यांची एक लिस्ट असते; पण तरीही तो मुलगा गोंधळ घालू लागला. धमक्या देऊ लागला. सोनू निगम पुढे विचारतो की, चूक कोणाची आहे? सोनू निगम म्हणतो की, मी खरा देशभक्त असल्याने, तो भाषा, जात किंवा धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा तिरस्कार करतो”.