राजमाता जिजाऊ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उत्तम नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती आणि त्यासोबतच कणखर राज्यकर्ती. पण त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांसोबत त्यांच्यातील एक हळवी आईदेखील लपल्याचं स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून पाहायला मिळतं. त्यामुळेच सध्या ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. दररोज या मालिकेत नवनवीन घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता ही मालिका रंजक वळणावर आल्याचं दिसून येत आहे.

जिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल आहे. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पहायला मिळणार आहेत. त्यासोबत अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे या मालिकेला नवीन रंजक वळण मिळणार आहे.

uday samant buldhana marathi news
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र
thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार? याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.