‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. सध्या या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळत आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र लवकरच या मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांचे पुन्हा एका थाटामाटात लग्न पार पडते. यामुळे घरात शिर्के पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र लवकरच या आनंदात विरजण पडणार आहे. कारण गौरीसमोर तिच्या वडिलांच्या मृत्यूबाबतचे एक मोठे सत्य येणार आहे.

pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
nilesh sable recalls meeting raj thackeray
निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”

हेही वाचा : ‘निदान सॉरी म्हणायला तरी…’, हिंदी अभिनेत्रीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार त्रस्त

नुकतंच मराठी टेलिव्हीजन इन्फॉर्मेशन या इन्स्टाग्राम पेजने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ गौरी सर्वांसमोर तिच्या वडिलांच्या मृत्यूमागील एक सत्य सांगताना दिसत आहे. गौरीच्या वडिलांचा खून गुंडांनी नाही तर दादासाहेबांनीच केला, असे सत्य गौरीपुढे आल्याचे दिसत आहे. हेच सत्य ती सर्वांना सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यानंतर आता गौरी यावर कशी प्रतिक्रिया देणार, शिर्के-पाटील कुटुंबातील व्यक्ती यानंतर दादांना काय प्रश्न विचारणार? हे सर्व पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच गौरीच्या आयुष्यात येणाऱ्या या अनपेक्षित वळणामुळे तिला धक्का बसणार का? याची देखील चाहत्यांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.