स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनू हे सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावली. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि यानंतर काही वेळाने त्यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta actor arvind dhanu passed away mumbai nrp
First published on: 26-07-2022 at 10:15 IST