‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच मालिकेत उदय शिर्के पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याचा नुकतंच साखरपुडा झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची गुडन्यूज दिली आहे.

अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत सर्व चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू,” असे कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट शेअर केले आहे.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला. “आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही,” असेही त्याने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. दरम्यान अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. त्यासोबतच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे.

दरम्यान सध्या‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेचं कथानक अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपलं आहे. या मालिकेत लवकरच कबड्डीचा सामना रंगणार आहे. शालिनीनं शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिच्या वडिलांच्या टीमसोबत कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट तिने घातली आहे. यामुळे जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटुंबानं कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. येत्या १० नोव्हेंबरला कबड्डीच्या या सामन्याचा भाग प्रदर्शित केला जाणार असल्याचे बोललं जात आहे.