कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले आणि हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं आहे. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. अभि-लितिकाची मैत्री देखील यामुळे आता संपुष्टात आलीय.

वटपौर्णिमेच्या दिवशी अभिमन्यू आणि लतिकाचे जुळू पाहणारं नातं पुन्हा दुरावलं. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून  मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून बाहेर काढलं. त्यामुळे अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे. त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहेत.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग

हे देखील वाचा: “काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत’; ‘ती’ महिला सोनाली कुलकर्णीला म्हणाली होती

अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागत आहे. एकीकडे अभिमन्यूने आईला वचन की दिलंय की, “मी लतिकाला घरी परत घेऊन येणार”. तर दुसरीकडे, लतिकाने बापूंना दिलेला शब्द. लतिका बापूंच्या विरुध्द जाऊन अभिमन्यूला साथ देईल ? का असा प्रश्न निर्माण झालाय.

त्यामुळे आता या नव्या संकटाला अभिमन्यू – लतिका कसे सामोर जातील? कशी एकमेकांची साथ देतील ? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.