बॉलिवूडचा अण्णा म्हणून अभिनेता सुनील शेट्टी हा ९० च्या दशकातील अॅक्शन हीरोंपैकी एक आहेत. सुनीलचा 'बलवान' हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून सुनील शेट्टीला लोकप्रियता मिळाली आणि त्याला अॅक्शन स्टारचा दर्जा मिळाला. सुनीलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २० वर्षांपूर्वीच सुनीलला जाणीव झाली होती की त्याने असे काही चित्रपट केले आहेत ज्याच्या त्याच्या करिअरवर चुकीचा परिणाम होईल. त्यानंतर एकदा तर सुनीलने अॅक्शन हिरोच्या प्रतिमेतून बाहेर पडत विनोदी चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला. सुनील शेट्टीने २० वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली होती. 'मला शिकण्याची संधी मिळाली. आजकाल, जेव्हा मी माझे आधीचे काही चित्रपट पाहतो, तेव्हा मला वाटते की ते सगळ्या चित्रपटांना नष्ट करून पुन्हा चांगले बनवावे. जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी जसे एक लहान बाळ गुडघ्यावर चालायला शिकते तसा मी होतो, त्यानंतर बसायला शिकलो आणि नंतर उभे राहायला शिकलो. तर आता मला आशा आहे की लवकरच मी धावू शकेन. मी माझा प्रत्येक चित्रपट हा माझ्या आधीच्या चित्रपटांपेक्षा चांगला आणि त्यात काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतो,' असे सुनील शेट्टी म्हणाला. View this post on Instagram A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा 'झक्कास' डान्स व्हायरल सुनील पुढे म्हणाला, '१० वर्षांचा काळ हा बराच मोठा आहे. मला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आले आहेत. हेच अनुभव आपल्याला जीवनातील चढ उतार शिकवतात, कारण आपल्याकडे आता जे काही आहे त्याची किंमत आपल्याला कळत नाही. मला आता कॉमेडी करायची आहे कारण मी तसाच आहे. माझ्या मित्रांना माझ्यासोबत बाहेर जायचे असते कारण मी त्यांना हसवत राहतो. माझे बॅकग्राऊंड मार्शल आर्टचे असल्याने मला अॅक्शन हीरोची भूमिका मिळते. तर जेव्हा आपण एकदा यशस्वी होतो तेव्हा आपल्याला त्याच भूमिका मिळतात.' आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी एकत्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दोघांनी मोहरा, वक्त हमारा है, हेराफेरी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अक्षय आज सुपरस्टार आहे. तर सुनील शेट्टी पुन्हा एकदा त्याची जागा मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.