छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही सातत्याने चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मात्र या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर गायब असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तिने ही मालिका सोडल्याचेही बोललं जात आहे. मात्र तिने यावर मौन सोडले आहे.

मधुराणी प्रभुलकर हिला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी अरुंधतीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. यात तिने मालिकेत तिच्या अनुपस्थित असण्यामागचे कारण सांगितले होते.
आणखी वाचा : “गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये मी स्वतः …” फसवणुकीच्या प्रकरणावर मधुराणी प्रभुलकर स्पष्टच बोलली

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

मधुराणी प्रभुलकर हिने आठवड्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने मालिकेत न झळकण्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. “माझी एक छोटी सर्जरी झाली असल्या कारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन, असे तिने यात म्हटले होते. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली होती.”

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते…’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या पतीची फसवणूक, हजारोंचा गंडा

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. या मालिकेत एकीकडे विशाखाचा पती केदार हा दारुच्या व्यसनातून बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यश आणि गौरी यांच्या दोघात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीने परदेशात नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय यशला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होताना दिसत आहे. त्यामुळे या मालिकेतील रंगत चांगलीच वाढत जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे.