बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्यामुळे मोठा ट्विस्ट आला होता. त्यात विकास सावंत शनिवारी (१७ नोव्हेंबर) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख हिचाही प्रवास संपुष्टात आला आहे. यानंतर नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अमृता देशमुखने अपूर्वा नेमळेकर ही नाटकी असल्याचे म्हटलं आहे. अमृता देशमुखने नुकतंच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त नाटकी कोण आहे असं तुला वाटतं? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने एकाही क्षणाचा विलंब न करता अपूर्वा असे नाव घेतले.आणखी वाचा : “काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट "बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त नाटकी अपूर्वाच आहे. माझी आता खात्री झाली आहे. मला आधीपर्यंत असं वाटत होतं की ती फार जास्त मोठ्याने बोलते किंवा तिची व्यक्त होण्याची पद्धत ही नाटकी असेल, ती चुकीची अजिबात नाही. पण ती तशीच आहे याची मला खात्री पटली. मी सुरुवातीला ती कशी आहे हे ठरवायचं नाही, असं ठरवलं होतं. पण त्यानंतर मला ती कशी आहे हे नीट समजायला लागलं.ती फक्त वर वर नाटकी असल्याचे दाखवत असली तरी तिचा मूळ स्वभावच नाटकी आहे. तुम्ही समोर एक वेगळं मत मांडता आणि त्याच्या मागे त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत आहात. हा स्वभाव प्रचंड नाटकी आहे", असेही अमृता देशमुख म्हणाली. आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले डबल एलिमिनेशन, विकास सावंत पडला बाहेर दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याने अमृताला खेळातून बाहेर पडावे लागेल. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. पण नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक नॉमिनेशन टास्कमध्ये अमृताला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेलं पाहायला मिळालं.