गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन सृष्टीत लग्नाचा माहोल सुरू आहे. अनेक आघाडीचे कलाकार गेल्यावर्षी विवाह बंधनात अडकले. तर आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री हंसी परमार नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

ग्वाल्हेरच्या आकाश श्रीवास्तव याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांचा हा विवाह सोहळा अगदी थाटामाटात ग्वाल्हेर येथे संपन्न झाला. त्या लग्न सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. लग्नाच्या वेळी हंसीने लाल रंगाचा घागरा परिधान केला होता तर आकाश ने सोनेरी आणि लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. सोबत असताना डोक्यावर लाल रंगाचा फेटा ही बांधला होता.

Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

आणखी वाचा : Video: आधी टॉवेल गुंडाळून कॅमेऱ्यासमोर केला डान्स अन् मग… श्रद्धा आर्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

काही वर्षांपूर्वी हंसी गुजरातमधून मुंबईत अभिनय क्षेत्रात आपला नशीब आजमावायला आली. मुंबईत ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच्या जवळच आकाश राहत होता. या दरम्यान दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्या छान मैत्री झाली. त्या मैत्रीतूनच त्यांच्यात प्रेम फुलत गेलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : “अखेर देवाने माझी इच्छा ऐकली…” लग्नाच्या १० वर्षांनी ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री होणार आई

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची सून झाल्यानंतर आता हंसी खुश आहे. ती मुलगी गुजरातची असल्यामुळे तिला ग्वाल्हेरमधील संस्कृती परंपरा माहित नव्हत्या. पण आता तिला त्याही कळू लागल्या आहेत आणि त्या ती जपत आहे. यापूर्वी ती कधीही ग्वाल्हेरला आली नव्हती असंही तिने सांगितलं. आता एकमेकांशी लग्न केल्यानंतर दोघेही जण खुश आहेत. सोशल मीडियावरून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करताना दिसत आहेत.