‘द कपिल शर्मा शो’ मागच्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. हा कार्यक्रम चर्चेत येतो ते म्हणजे यात आलेल्या कलाकारांमुळे अथवा या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांनी जर कार्यक्रमातून एक्झिट घेतली तर, या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे कपिल आपल्या शैलीत स्वागत करतोच मत त्यांची खिल्लीदेखील उडवत असतो. नुकतेच कार्तिक आर्यन क्रिती सॅनॉन या कार्यक्रमात आले होते. तेव्हा क्रितीने कपिलला असे उत्तर दिले की त्यावर कपिल निशब्द झाला.

कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन सध्या चर्चेत आहेत. त्यांचा ‘शेहजादा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ते कपिल शर्माच्या कार्यक्रमात आले होते. नुकताच याचा प्रोमो व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात कपिल कार्तिकला म्हणाला की “चित्रपटात तू क्रितीची खूप स्तुती करत आहेस, मात्र नंतर वेगळं बोल्ट्स तर ते स्क्रिप्टमध्ये होत की भोपाळमधील काही गोष्टी आठवल्या का?” त्यावर कार्तिकने दुजोरा दिला. लगेच कपिलने क्रितीकडे मोर्चा वळवला तो असं म्हणाला, “क्रिती म्हणते लांब पाय असलेल्यांची लाथ बसू शकते कधी याचा वापर केला आहे?” त्यावर कपिलकडे बघत म्हणाली “दाखवू का करून?” तिच्या या रिप्लायवर सगळे हसायला लागले. चित्रपटात तिच्या तोंडी हा संवाद आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

Video : “यात भाजपाची चूक, आप ने तर…” अनुपम खेर दिल्लीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल

‘शेहजादा’ चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता मात्र शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला तूफान प्रतिसाद बघता ‘शेहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रापाचे प्रदर्शन लांबवले असून हा चित्रपट आता १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल.

हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करत असून, कार्तिकबरोबर क्रिती सॅनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत