‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘अप्पी आमची कलेक्टर’,’पुन्हा कर्तव्य आहे’ यांसारख्या मालिकांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘झी मराठी’ने गेल्या वर्षभरात एकापेक्षा एक अशा विविध विष्यांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. या सर्वच मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. परंतु सध्या मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी सध्याच्या काळात टीआरपीला प्रचंड महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेक मालिका वर्षभरात बंद होताना दिसल्या अशातच आता आनखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
‘नवरी मिळे हिटलर’ला ही मालिका १८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाली होती, तर नुकतेच मार्च महिन्यात या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. यादरम्यान मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्नस आलेले पाहायला मिळले. पहिली पत्नी अंतराच्या जाण्याने निराश झालेला अभिराम जहागीरदार यांच्या आयुष्यात लीलाच्या येण्याने पुन्हा आनंद आला, तर प्रत्येक गोष्टीत धडपडणारी लीला अभिराममुळे सावरायला लागली. त्यामुळे लीला-एजे यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना विशेष आवडली. एजे-लीला, जहागीरदार घरातील तीन मुलं, तीन सुना, आजी या सगळ्या पात्रांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. अशातच आता ही मालिका संपणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली लीली म्हणजेच अभिनेत्री वल्लरी वीराज हिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती.
वल्लरीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने “सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो” असं लिहिलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे वल्लरीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यानच्या काळात टीआरपीमुळे अनेक मालिका बंद होताना दिसल्या, त्यामुळे आता ही मालिकासुद्धा बंद होणार का असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे.

वल्लरीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने “सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो” असं लिहिलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे वल्लरीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यानच्या काळात टीआरपीमुळे अनेक मालिका बंद होताना दिसल्या, त्यामुळे आता ही मालिकासुद्धा बंद होणार का असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे.
सध्या ‘नवरी मिळे हिटलर’ला या मालिकेत ट्विस्ट आलं असून काही दिवसांपूर्वीच एजेंची पहिली बायको अंतराची मालिकेत एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. तेव्हा खरंतर या मालिकेला वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मालिकेत अनेक घडामोडी घडल्या, परंतु अशातच आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा मालिकेच्या निर्मात्यांनी किंवा वाहिनीने केलेली नाही.