सध्या संपूर्ण देशामध्ये श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणाची चर्चा आहे. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने गळा आवळून हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एका दक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्या नात्यासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. 'दीया और बाती हम' मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनीने श्रद्धा वालकर प्रकरणामुळे अत्यावस्थ झाली आहे. कनिष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन स्वत:चे असेच काही अनुभव सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. या व्हिडीओ कनिष्काने आपणही आफताबसारख्या मानसिकतेच्या व्यक्तीने दिलेल्या त्रासातून गेल्याचं म्हटलं आहे. नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर श्रद्धाबरोबर जे काही घडलं तसाच प्रकार माझ्याबरोबरही घडला असल्याने या साऱ्या घटनेशी मी स्वत:ला चांगल्यापद्धतीने रिलेट करु शकते, असं कनिष्काचं म्हणणं आहे. "श्रद्धाच्या गोष्टीशी मी स्वत:ला रिलेट करु शकते. मला आजही आठवतंय की त्या अभिनेत्याने मला प्रोपोज करताना लग्नाबद्दलचं आश्वासन दिलेलं. मी जेव्हा त्याच्याबरोबर रिलेशनमध्ये होते तेव्हा त्याचा तीव्र संताप, हिंसक वागणं आणि मद्यपानाच्या सवयी सहन केल्या होत्या. लग्नानंतर त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं मला वाटलं होतं. मी बराचसा वेळ त्याच्याच घरी असायचे. तो मला लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहण्याची मागणी करत होते. मात्र मी ज्या कुटुंबातून आलेली आहे तिथे मला या गोष्टीसाठी परवानगी नाही. तसेच मी स्वत:ही या लिव्ह-इन रिलेशनशीपच्या फेव्हरमध्ये नाही," असं कनिष्काने व्हिडीओत सांगितलं आहे. नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “नॉन-व्हेज खाण्यासाठी आफताब श्रद्धावर बळजबरी करायचा, तिने नकार दिल्यास…”; नवा खुलासा "मी बराच वेळ त्याच्या घरीच घालवायची कारण मला अपेक्षा होती की तो माझ्याशी लग्न करेल. एकदा मी त्याला आपण लग्न कधी करायचं असं विचारलं. मी केवळ लग्नाच्या अपेक्षेने त्याच्याबरोबर राहत होते. माझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने लवकरच असं सांगितलं. मी त्याच्याबरोबर सुखी संसार थाटण्याची बरीच स्वप्नं पाहिली होती. मात्र मी पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला तेव्हा तो प्रचंड संतापला. त्या रात्री त्याने मला बेदम मारहाण केली. त्यानंतर माझ्या मनात अशी भिती निर्माण झाली की हा कधीही मला मारुन टाकू शकतो. मी त्याच रात्री त्याच्या घरातून माझं सर्व सामान घेऊन पळून आले. प्रेमात की केवळ मुलांचं हे हिंसक रुप पाहिलं आहे," असंही कनिष्काने सांगितलं. नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…” सर्वसामान्य मुलींनाही कनिष्काने सल्ला दिला आहे. "मला नाही वाटत की आपल्या देशामध्ये मुली लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये यासाठी राहतात की त्यांना संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीबरोबर काढायचं आहे. मुली केवळ टाइमपास म्हणून लिव्ह-इनसारखा मोठा निर्णय घेत नाहीत. आपल्या देशात सध्या जी स्थिती आहे त्यानुसार प्रत्येक जण आपआपला अर्थ यातून काढतो. मी मुलींना लिव्ह-इनसंदर्भात हाच सल्ला देऊ शकते की परिस्थिती बदलली असली तरी जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका," असं कनिष्का म्हणाली. नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु अशी भयानक मनस्थिती असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करुन राहण्याऐवजी मुलींनी एकटं राहिलेलं परवडलं असंही कनिष्काने सांगितलं. मनोरंजन क्षेत्रातील कलाकार या विषयावर काही भाष्य करत नाही हे फारच धक्कादायक असल्याचंही कनिष्काने म्हटलं आहे.