स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका या चांगल्याच चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे काय असतं’, ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिका कायमच प्रेक्षकांचा चर्चेचा विषय ठरलेला असतात. छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

समृद्धी केळकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ती आयपीएसच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यावर तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीला टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे त्यांनी लिहिले आहे. तिच्या या पोस्टनंतर ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान स्टार प्रवाहवरील सर्वात जुनी मालिका म्हणून ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेने पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र आता किर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. यामुळे ही मालिकेला ट्रोल केले जातं आहे. त्यातच आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.