‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले. जेनिफरनंतर याच कार्यक्रमांमध्ये ‘रीटा रिपोर्टर’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजानेही निर्मात्यांच्या वागण्यावर टीका केली. तर आता तिने जेनिफरला पाठिंबा दिला आहे.

जेनिफरने या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक टिप्पणी केल्याचे आरोप करताना या मालिकेतील काही कलाकार तिच्या बाजूने बोलले तर काहींनी तिच्यावरच टीका केली. जेनिफरने निर्मात्याविरुद्ध आवाज उठवल्यावर प्रिया अहुजाने देखील तिला आलेला वाईट अनुभव सांगितला होता. तर आता तिने जेनिफरची बाजू घेत ती सेटवर कशी वागायची, हे सांगितलं आहे.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

आणखी वाचा : “तो पुरुष असल्याने…,” ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरबद्दल जेनिफर मिस्त्रीने व्यक्त केला संताप, जाणून घ्या नेमकं काय घडलं

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, “मालिकेतील कोणीही कलाकार जेनिफरच्या बाजूने बोलले नाही हे पाहिल्यावर मी खूप थक्क झाले. कारण सेटवर तिची अनेकांशी खूप चांगली मैत्री होती. माझ्या कठीण काळात जेनिफर माझ्याबरोबर होती. मी हे नक्कीच सांगेन की ती कधीही सेटवर कोणाशीही वाईट वागायची नाही किंवा कोणालाही हीन वागणूक द्यायची नाही.”

हेही वाचा : “माझ्या गरोदरपणानंतर…,” ‘तारक मेहता…’मध्ये ‘रिटा रिपोर्टर’ साकारणाऱ्या प्रिया अहुजाचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली…

दरम्यान, प्रिया अहुजा ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे माजी दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी आहे. तर मालिकेच्या सेटवर तिला अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावं लागायचं असं तिने मध्यंतरी म्हटलं होतं. “कामाच्या बाबतीत निर्मात्यांनी माझ्याबरोबर अन्याय केला. मालव आणि माझं लग्न झाल्यानंतर या मालिकेतून माझा ट्रॅक कमी केला गेला. कधीही या मालिकेत काम करत असताना योग्य वागणूक मिळाली नाही,” असंही ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती.